आरोह तसाच निघून चिन्मयला भेटायला येतो. चिन्मय त्याच्यावर चिडतो आणि त्याला समजावतो. आपलं काहीतरी बिनसलं आहे ह्याची जाणीव सारिकाला पदोपदी होत राहते. मिहीर खूप आपुलकीने तिच्याशी वागू लागतो ज्यामुळे ती अजून गुंतत जाते. घडलेल्या प्रकाराबद्दल आरोह मानसीची माफी मागतो. जवळच असलेल्या वादळाबाबत राधिका चिन्मयला सावध करते.