मानसी आणि आरोह एक खूप मोठा निर्णय घेतात ज्यामुळे सारिकाच्या वागण्यात एकदम बदल घडतो. जाई आणि चिन्मय सुद्धा थक्क होतात. सारिका मिहीरशी जवळीक साधायचा प्रयत्न करते ज्यामुळे मिहीरला खूप छान वाटू लागतं. ऑफिसमध्ये एक खूप मोठा गौप्यस्फोट होतो ज्यामुळे मानसीला आरोहचा खूप राग येतो आणि ती त्याच्याशी बोलणं थांबवते. तिचा गैरसमज न होता तिला समजावणं हे आरोहच्या समोर एक खूप मोठं संकट असतं. ती त्याच्यापुढे एक मोठी अट ठेवते. आरोह हतबल होतो. सारिका मिहीरला खरं सांगून टाकते.