घडलेल्या प्रकारानंतर सारिकाचं आयुष्य बदलून जातं. मानसीला आरोहजवळ एक अशी गोष्ट सापडते ज्याने तिचे त्याच्याविषयीचे विचार बदलतात. मानसी सारिकाशी बोलते. आरोह एका मोठ्या चक्रव्युहात अडकतो आणि मानसिकरित्या खचतो. कामानिमित्त सारिकाचं गोव्याला जायचं ठरतं. तिकडे गेल्यावर तिला शांत वाटू लागतं; पण तिच्या मार्गावर काय वाढून ठेवलंय ह्याची तिला आजीबात कल्पना नसते.